रविवार, १ डिसेंबर, २०१३

आज काल मी अभ्यासच थांबवला ....काय मिलते हो त्यातून ?



आपण अनुभवलेले व्यक्त करणे ही सहज प्रक्रिया आहे. व्यक्त करत असताना आपण बोलण्यातून, छायाचित्रातून व लेखनातून व्यक्त होत असतो. लेखनातून व्यक्त होणे थोडे अवघड असते. आपल्या भावना शब्दात लिहून व्यक्त करणे हे तसे अवघड जाते. पाहू वेळ मिळेल तसे लिहू. निवांत वेळ मिळाल्यावर लिहू. आता काय घाई आहे मग पाहू हे खरे तर दोन कारणानी होते १)म्हणजे असे लिहिण्याची सवय नसते २) आणि असेल तर आपल्यात खूप आळस असतो.

पहिली स्थिती असेल तर शिकणे ही प्रक्रिया असते. पण आपण आज काल शिकण्यासाठी खूप कमी वेळ देतो. आपले शिकणे काही कारणास्तव असते. मला स्वतःला जे आपण परीक्षेसाठी करतो किंवा पदवीसाठी करतो अथवा नौकरी मिळावी म्हणून करतो. खर पाहता अभ्यास करणे व शिकणे या दोन सारख्याच प्रकिया आहेत आपण त्यात थोडा भेद आहे. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी शिकणे म्हणजे अभ्यास करणे नव्हे. आपल्या स्वतःला आजच्या आपल्या अवस्थेपेक्षा उन्नत किंवा अधिक विकसित अवस्थेत नेण्यासाठी शिकणे म्हणजे अभ्यास करणे. अशा प्रकारच्या अभ्यासाने आपले मन एकाग्र होण्यास मदत होते व आपल्या विकासाची प्रक्रिया सतत चालू राहते.

मुळात दुसऱ्या प्रकारचा आडथळा म्हणजे आळस हा केवळ आपण आपल्या शैक्षणिक काळात केवळ काही तरी मिळवण्यासाठी केलेले शिक्षण असते व आता ते मिळवल्यावर शिकण्याचा थोडा कंटाळा आलेला असतो.फार केले न आता बस आता निवांत जगू ...पण निवांत जगू म्हणजे काय ? खरच आपण निवांत जगत असतो का ? मला वाटते या निवांत जगू या मध्ये एक प्रकारचा आपण टाईमपास करत असतो. कारण आपल्याला आपल्या आयुष्याचे महत्वच कळलेले नसते. आयुष्य म्हणजे भोग घेणे होऊन बसते व आपण निखळ आनंदाला पारखे होतो. निखळ आनंदासाठी सतत अभ्यास करत राहणे गरजेचे असते. मनाची निरव शांतता म्हणजे आनंद. भोगा मुळे तो काही काळासाठी मिळतो पण तो तात्पुरता असतो. सतत आपल्या मनाला निखळ आनंदात ठेवण्यासाठी नियमित अभ्यास करत राहणे आवश्यक असते.

आपण अभ्यास करेन म्हणजे पाहणे, अनुभवणे,निरीक्षण करणे, समीक्षण करणे, मग त्यानतंर व्यक्त होणे. मी अगदी वर सांगितल्या प्रमाणे.

आपण अभ्यास करतो का याचे पाहिले दृश्य स्वरूप म्हणजे आपण ते लिखित स्वरुपात व्यक्त करतो. दुसरे ते लगेचच करतो म्हणजे अनुभव घेतल्यावर काही वेळात. कधी कधी आपला विचार पण पूर्ण झाला की नाही हे न पाहता पण. अर्थात पहिली गोष्ट होते ती म्हणजे आपण तत्पर होतो अर्थात आपण प्रतिसादी होतो. ही अभ्यासाची पहिली पायरी.

दुसरी पायरी आपण काय अनुभवले याचे वर्णन करणे. हे केवळ बाह्य स्वरूपाचे असते. यात आपण आपल्याला जाणवलेल्या त्यावेळच्या भावना पण व्यक्त करतो.

तिसरी पायरी आपण काही गोष्टी काही कारणास्तव व्यक्त करत नाहीत. दुसऱ्याचा राग येईल किंवा काही अनाहूत भीती. एकदा आपण याच्याही वर गेलोत की आपण पाहणे व त्याचे आपल्या मनावर बुद्धीवर झालेले परिणाम नेमक्या शब्दात व्यक्त करतो.

चवथी पायरी काही गोष्टी आपल्या मनाला इतक्या भिडतात की आपण नीट विचार करून त्या आपल्या जीवनाचा एक भाग बनवतो. हळूहळू त्या भिडलेल्या भावनाचे आपण प्रतिनिधी बनतो.

थोडक्यात आपण स्वतःला आपल्या नवनिर्मित अवस्थेत रुपांतरीत करतो.
ही प्रकिया सतत जगत राहणे म्हणजे अभ्यास करणे असे मला वाटते.....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: