असच मनातले लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
असच मनातले लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, १८ नोव्हेंबर, २०१५

विचारप्रक्रियेवर परिणाम करणारे घटक कोणते ?

“ Whatever you think that you will be.” Swami Vivekananda
“As you think, so shall you become.” Bruce Lee.

गेल्या काही दिवसांपासून आपल्या विचारप्रक्रियेवर परिणाम करणारे घटक कोणते याचा विचार करत होतो. आपल्या विचारांचा आपल्या जगण्यावर परिणाम होत असतो. आपण जसा विचार करत जातो तसे बनत जातो. स्वामी विवेकानंद हे विचारवंत व बुस ली एक ताकदवान खेळाडू. दोघांचीही जी प्रसिद्ध वाक्य आहेत त्यातून हाच बोध होतो की विचारांचा खूप मोठा परिणाम आपल्यावर व अर्थात आपल्या जगण्यावर होत असतो.

आता प्रश्न हा येतो की आपल्या विचारांवर कशाचा परिणाम होतो. नीट समजून घेतले असता असे लक्षात येते की आपले मन, आपले बोलणे, आपले शरीर व आपण करत असलेलो काम या चार गोष्टींचा आपल्या विचारांवर परिणाम होत असतो.
मन :- आपल्या मनाची स्थिती अर्थात आपली भावनिक स्थिती कशी आहे ? आपली मनाची स्थिती किंवा आपली भावनिक स्थिती ही अवलंबून असते ती आपण आपल्या पंचेद्रियांच्या द्वारे ग्रहण करत असलेल्या ज्ञानावर. हे ज्ञान जेवढे अचूक तेवढे चांगले. ज्ञानाची अचूकता आपल्याला आलेल्या आधिच्या अनुभवांच्या संचीतावर अवलंबून असते. पूर्वीच्या अनुभवातून आपण समृद्ध व्हावयास हवे पण बऱ्याच वेळी आपण घाबरट,संशयी बनतो किंवा आपल्या विचारात एक साचेबंद पणा येतो.त्यामुळे पंचेद्रियांच्या द्वारे ग्रहण केलेले ज्ञान अचूक असण्यासाठी ते पूर्वग्रहदूषित दुषित तर नाही न याची काळजी नक्की घ्यावयाची असते. मनाचे अवधान, एकाग्रता, संकल्प व कल्पकता याचा आपल्या ज्ञान ग्रहण करण्याच्या प्रकियेवर खूप परिणाम होतो आणि यावरून आपल्या मनाची स्थितीचे आकलन आपल्याला होते. मन जेवढे आपण शांत करत जाऊ तसे मनाचा आपल्या विचारांवरील परिणाम चांगला व्हायला लागतो.

बोलणे :- आपल्या बोलण्याचा आपल्या विचारांवर खूपच परिणाम होत असतो. बोलणे कसे आहे ? खरे की खोटे, बोचरे,खिजवणारे किंवा त्रास दायक की समजून घेणारे, समजून सांगणारे की दोष दाखवणारे, चिडके की प्रसन्न,चहाडी-कुचेष्टा-निंदा करणारे की चांगल्या गोष्टी सांगणारे. आपण सर्वांशी कसे बोलतो याचा परिणाम आपल्या विचारांवर नक्कीच होत असतो. आपली बोलणे दोन प्रकारेचे असते एक प्रगट मोठ्या आवाजात तर दुसरे मनातील मनात. आपण प्रगट बोलण्याच्या आधी आपल्या मनातल्या मनात आपण काही प्रतिक्रिया दिलेल्या असतात. त्या मनातील प्रतिक्रियांचा पण खूप मोठा परिणाम आपल्यावर होत असतो. याच बरोबर आपण जेवढे लोकांशी बोलत असतो त्याही पेक्षा जास्त आपण आपल्याशीच बोलत असतो. आपल्या भोवती घडणाऱ्या घटनांना आपण आपल्यालाच दिलेली प्रतिक्रिया म्हणजे हा आपल्याशीच असलेला हा मौन संवाद. हे बोलणे नेमके कसे असते हे समजून घेतले की आपल्याला लगेच लक्षात येईल की आपल्या स्वतःची बोलण्याचा परिणाम आपल्या विचारांवर किती मोठा होतो. तटस्थपणे आपण आपल्या बोलणे साधक बाधक रित्या समजून घेवू लागलो की त्याचा चांगला परिणाम आपल्या विचारांवर होत असतो.

शरीर :- आपल्या शरीराची अवस्था कशी आहे याचा खूप मोठा परिणाम आपल्या विचारांवर होत असतो. वेगवेगळ्या वयात आपल्या शरीराची स्थितीव वेगळी असते. त्यामुळे वयानुसार आपले विचार बदलत जातात याचा अनुभव पण आपण घेतो. शरीर रोगांनी ग्रासलेले आहे की निरोगी. खूप थकलेले आहे की मस्त तजेलदार,भुकेले-तहानेले की तृप्त यासर्वाचा परिणाम आपल्या विचारांवर होत असतो. आपले शरीर निरोगी, सतेज आणि शक्तिशाली असलेकी त्याचा चांगला परिणाम आपल्या विचारांवर होतो.

काम ( कार्य ):- आपण जे काही काम करत असतो त्याचा खूप मोठा परिणाम आपल्या विचारांवर होत असतो. ज्या कामातून काही चांगले निष्पन्न होणार आहे. आपल्या भोवतीच्या लोकांचे चांगले होणार आहे.अनेकांच्या उपयोगाचे ते काम असणार आहे. काम चुकारी, आपले काम दुसऱ्यावर, आजचे काम उद्यावर याचा खूप वाईट परिणाम आपल्या विचारांवर होतो. आपण ज्या परिक्षेत्रात काम करतो किंवा कुणासोबत काम करतो याचा परिणाम पण आपल्या विचारांवर होत असतो. स्वतःचा उदरभरण होण्यासोबत व्यापक मानवाच्या हितासाठी, नवनिर्मिती करणारे काम आपल्या विचारांवर खूप चांगला परिणाम करते.

आत्ता पर्यंत तरी मला या चार गोष्टी समजल्या यापेक्षा अजून काही आपल्याला समजल्या असतील तर नक्कीच सांगा मला त्याचा खूप उपयोग होईल.

रविवार, १ डिसेंबर, २०१३

आज काल मी अभ्यासच थांबवला ....काय मिलते हो त्यातून ?



आपण अनुभवलेले व्यक्त करणे ही सहज प्रक्रिया आहे. व्यक्त करत असताना आपण बोलण्यातून, छायाचित्रातून व लेखनातून व्यक्त होत असतो. लेखनातून व्यक्त होणे थोडे अवघड असते. आपल्या भावना शब्दात लिहून व्यक्त करणे हे तसे अवघड जाते. पाहू वेळ मिळेल तसे लिहू. निवांत वेळ मिळाल्यावर लिहू. आता काय घाई आहे मग पाहू हे खरे तर दोन कारणानी होते १)म्हणजे असे लिहिण्याची सवय नसते २) आणि असेल तर आपल्यात खूप आळस असतो.

पहिली स्थिती असेल तर शिकणे ही प्रक्रिया असते. पण आपण आज काल शिकण्यासाठी खूप कमी वेळ देतो. आपले शिकणे काही कारणास्तव असते. मला स्वतःला जे आपण परीक्षेसाठी करतो किंवा पदवीसाठी करतो अथवा नौकरी मिळावी म्हणून करतो. खर पाहता अभ्यास करणे व शिकणे या दोन सारख्याच प्रकिया आहेत आपण त्यात थोडा भेद आहे. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी शिकणे म्हणजे अभ्यास करणे नव्हे. आपल्या स्वतःला आजच्या आपल्या अवस्थेपेक्षा उन्नत किंवा अधिक विकसित अवस्थेत नेण्यासाठी शिकणे म्हणजे अभ्यास करणे. अशा प्रकारच्या अभ्यासाने आपले मन एकाग्र होण्यास मदत होते व आपल्या विकासाची प्रक्रिया सतत चालू राहते.

मुळात दुसऱ्या प्रकारचा आडथळा म्हणजे आळस हा केवळ आपण आपल्या शैक्षणिक काळात केवळ काही तरी मिळवण्यासाठी केलेले शिक्षण असते व आता ते मिळवल्यावर शिकण्याचा थोडा कंटाळा आलेला असतो.फार केले न आता बस आता निवांत जगू ...पण निवांत जगू म्हणजे काय ? खरच आपण निवांत जगत असतो का ? मला वाटते या निवांत जगू या मध्ये एक प्रकारचा आपण टाईमपास करत असतो. कारण आपल्याला आपल्या आयुष्याचे महत्वच कळलेले नसते. आयुष्य म्हणजे भोग घेणे होऊन बसते व आपण निखळ आनंदाला पारखे होतो. निखळ आनंदासाठी सतत अभ्यास करत राहणे गरजेचे असते. मनाची निरव शांतता म्हणजे आनंद. भोगा मुळे तो काही काळासाठी मिळतो पण तो तात्पुरता असतो. सतत आपल्या मनाला निखळ आनंदात ठेवण्यासाठी नियमित अभ्यास करत राहणे आवश्यक असते.

आपण अभ्यास करेन म्हणजे पाहणे, अनुभवणे,निरीक्षण करणे, समीक्षण करणे, मग त्यानतंर व्यक्त होणे. मी अगदी वर सांगितल्या प्रमाणे.

आपण अभ्यास करतो का याचे पाहिले दृश्य स्वरूप म्हणजे आपण ते लिखित स्वरुपात व्यक्त करतो. दुसरे ते लगेचच करतो म्हणजे अनुभव घेतल्यावर काही वेळात. कधी कधी आपला विचार पण पूर्ण झाला की नाही हे न पाहता पण. अर्थात पहिली गोष्ट होते ती म्हणजे आपण तत्पर होतो अर्थात आपण प्रतिसादी होतो. ही अभ्यासाची पहिली पायरी.

दुसरी पायरी आपण काय अनुभवले याचे वर्णन करणे. हे केवळ बाह्य स्वरूपाचे असते. यात आपण आपल्याला जाणवलेल्या त्यावेळच्या भावना पण व्यक्त करतो.

तिसरी पायरी आपण काही गोष्टी काही कारणास्तव व्यक्त करत नाहीत. दुसऱ्याचा राग येईल किंवा काही अनाहूत भीती. एकदा आपण याच्याही वर गेलोत की आपण पाहणे व त्याचे आपल्या मनावर बुद्धीवर झालेले परिणाम नेमक्या शब्दात व्यक्त करतो.

चवथी पायरी काही गोष्टी आपल्या मनाला इतक्या भिडतात की आपण नीट विचार करून त्या आपल्या जीवनाचा एक भाग बनवतो. हळूहळू त्या भिडलेल्या भावनाचे आपण प्रतिनिधी बनतो.

थोडक्यात आपण स्वतःला आपल्या नवनिर्मित अवस्थेत रुपांतरीत करतो.
ही प्रकिया सतत जगत राहणे म्हणजे अभ्यास करणे असे मला वाटते.....